परीक्षा काळात पालकांनी विद्यार्थ्यांवर दबावात्मक वातावरण निर्माण करू नये राजेंद्र सोनवणे यांचे पालकांना आव्हान

जामनेर (प्रतिनिधी )परीक्षेच्या काळात पालकांनी विद्यार्थ्यांवर दबावात्मक वातावरण निर्माण करू नये राजेंद्र सोनवणे यांचे पालकांना आव्हानकेले आहे सर्व अभ्यास आठवतो ना, तु कसा नंबर आणशील, पास होशील की नाही? परीक्षेच्या काळात असे नेहमी आई वडील आपल्या मुलांना बोलत असंतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर खूप आघात होतात. याकरिता पालकांनी आपल्या मुलाची मानसिकता ओळखून उत्कृष्ट सकारात्मक पालकाची भूमिका ही निभावली पाहिजे…१)परीक्षेच्या काळात मुलांना नेहमी मातापिताने अभ्यासाबद्दल बोलणे योग्य नाही.२) परीक्षा कालावधीत पालकांनी मुलांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर दबाव अथवा इतर मुलांबाबत टोमणे मारू नये.३) सर्व मुलांचा आयक्यू लेव्हल हा वेगवेगळा असतो त्यामुळे इतर मुलांबाबत आपल्या मुलाची तुलना करू नये त्यामुळे आपला मुलगा निराश होतो.४) परीक्षा कालावधीत मुलांना प्रोत्साहित करा त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो.५) प्रत्येक वेळी मुलाला अभ्यासा बाबत टोकणे व त्याच्यावर नजर ठेवणे त्यामुळे मुलांमध्ये माता पिता बद्दल असंतोषाची भावना पैदा होते. अशावेळी घरातील सदस्यांनी असे न करता आपल्या घरात आनंदीत वातावरण ठेवले पाहिजे.६) आपल्या मुलाला वेळापत्रक बनविण्यात व परीक्षा कालावधीत त्यास असलेल्या अडचणीत मदत केली पाहिजे व आपला मुलासअभ्यास करताना मध्ये मध्ये थोडा वेळ गॅप घेऊ द्या. असे आवाहन प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *