भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह

जळगांव (जितेंद्र सोनवणे )आज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहांतर्गत जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादाद्वारे विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचे फायदे, त्यांचा वापर आणि त्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी:

जिल्हाधिकारी महोदयांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक अधिकारांविषयी जागरूक केले. तसेच, भविष्यातील संधी आणि प्रशासनाच्या सहाय्याने मिळणारे फायदे यावर चर्चा केली.

 उपस्थित अधिकारी:
▪️ सहा. आयुक्त समाजकल्याण श्री योगेश पाटील

 प्रशासनाची भूमिका:
सामाजिक समतेच्या दिशेने विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवता येईल, यासाठी शासकीय विभाग एकत्रितपणे कार्यरत आहेत.

 सामाजिक समतेच्या मार्गावर, प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य संधी देण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *