अवकाळी पाऊस व वादळ मुळे नुकसान बाबत जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली आढावा बैठक…

जळगांव (जितेंद्र सोनवणे)जळगांव जिल्ह्यात दि.०६/०५/२०२५ रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस व वादळी वारे येऊन अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून, याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत आढवा बैठक घेण्यात आली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी संबंधितांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे तत्काळ पंचमाने करणे बाबत सूचना देऊन, प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत विमा उतरविलेल्या सर्व शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप (Crop Insurance) वर किंवा पिक विमा कंपनी कडे संपर्क साधून आपल्या नुकसानीची माहिती देऊन पंचनामा करून घ्यावा अशा सूचना दिल्या.

यावेळी पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह खासदार स्मिताताई वाघ, आमदार श्री.सुरेश भोळे, आमदार श्री.चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल ई. उपस्थित प्रमुख उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *