वाघूर उपसा जलसिंचन योजना – वाकी खु. (ता. जामनेर) येथे ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी प्रशासनाचा थेट संवाद!


जामनेर (प्रतिनिधी)वाघूर उपसा सिंचन योजना अंतर्गत प्रस्तावित शेततळे निर्मितीबाबत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन संवाद साधत आहे. वाकी खु. (ता. जामनेर) येथे शेतकरी व ग्रामस्थांसोबत प्रशासनाने चर्चा केली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी शेततळ्यांचे फायदे, अनुदान योजना आणि जलसंधारणाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेततळे निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व आर्थिक मदत सिंचन सुविधा उपलब्ध करून पीक उत्पादन वाढवण्यावर भर मत्स्यपालन व फळझाड लागवडीला चालना देण्यासाठी मार्गदर्शन शेततळ्यांबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन उपाययोजना योजनेच्या तांत्रिक बाबी व अनुदान प्रक्रियेची सविस्तर माहिती प्रकल्पाच्या प्रगतीवर नियमित आढावा व त्वरित अंमलबजावणी.

जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन:”शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि पाण्याचे नियोजन प्रभावीपणे करावे. प्रशासन तुमच्यासोबत आहे आणि प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.”

पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांचे विशेष लक्ष!
“जिल्ह्यातील शेती सुजलाम-सुफलाम व्हावी यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक शेतकऱ्याने यात सक्रिय सहभाग घ्यावा.”
शेतकरी हितासाठी प्रशासनाचा प्रत्यक्ष सहभाग – सिंचन सुविधा अधिक व्यापक आणि शाश्वत करण्यासाठी ठोस पावले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *